सार्थ ज्ञानेश्वरी : संपादक शंकर वामन दांडेकर
अध्याय १५ नमन
आता हृदय हे आपुले । चौफ़ळुणिया भले । वरी बैसवू पावले । श्री गुरूंची ।।१।।ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळे । भरुनीया पुष्पांजली अर्घु देवो ।।२।।
अनन्योदके धुवट । वासना जे तनिष्ठ । ते लागलेसे अबोट ।चन्दनाचे ।।३।।
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळुनी नूपुरे । लेवऊ सुकुमारें पदे तिये ।।४।।
घणावली आवडी । अव्यभिचारे चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळीया ।।५।।
आनंदामोद बहळ । सात्विका चे मुकुल । ते उमलले अष्टदळ । ठेऊ वरी ।।६।।
तेथे अहं हा धूप जाळू । नाहंतेजेवोवाळू । साम्रस्ये पोटाळू । निरंतर ।।७।।
माझी ताणू आणि प्राण । इया दोनी पाऊवा लेवू । श्री चरण । करू भोगमोक्षनिंबलोण । पाया तया ।।८।।
इया गुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ।।९।।
आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करू ।।१।।
श्री गुरु व आपण एक आहोत , अश्या एक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत , सर्व इंद्रियारुपी कमळकळ्या भरून, त्या पुष्पांजळी चे अरंघ्या श्री गुरूंच्या चरणा वर देउ .।।१।।
ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळी भरुनीया । पुष्पांजली अर्घु देवो ।।२।।
श्री गुरु व आपण एक आहोत . अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळ कळयां भरून , त्या पुष्पांजळी चे अर्घ श्रीगुरूंच्या चरणावर देऊ ।।२।।
अननयॊदके धुवट \। वासना जे तननिष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ।।३।।
एक निष्ठारूप स्वछ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषई असलेली वासना , तेस श्रीगुरुस गंधाचे बोट लावू .।।३ }}
(श्री गुरूंविशई चे) प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घाघरांचे वाळे सद्गुरुंच्या सुकुमार पायात घालू ।।४।।
अनन्यतने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम , हीच कोणी जोडवी ती सद्गुरुंच्या पायाच्या अंगठ्यात घालू ।।५।।
आनंदरुपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमळलेली कमळ कळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूच्या पायावर वाहू .||६।।
देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती , हाच कोणी एवरून क धूप तो श्री गुरुचरणां जवॅळ जाळू .या देहादिकांपैकी मी कोणी नाही , अशी जी उत्पन्न झालेली निराभिमान बोध वृत्ती , हेच कोणी तेज त्या तेजाने
श्री गुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणास तदाकार्तेने नेहमी आलिंगन देऊ .
। ।७।।
श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूल देह व लिंग देह ) या दोन खडावा करून घालू व ऐहिकपार्त्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .।।८।।
ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिहासनावर राज्याभिषेक होतो , त्या दैवास या श्रीगुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही योग्य होतो ।।९।।