म्हणौनि मनपण मोडे । तैं इंद्रिये आधीच उबडे । सुत्राधारेंविण साईखडे वावो जैसे ।।३०१।। अ १३ श्लोक ७
म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हलणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते ,तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो त्या , आगोदरच इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते